आनंदी जीवनाची गुरुकिल्ली
आदरणीय शिक्षक, माझे प्रिय मित्रमंडळी आणि सर्व उपस्थित मान्यवर, मित्रांनो जीवन खूप सुंदर आहे. जीवनात नेहमी आनंदी रहा कोणत्याही गोष्टीचा द्वेष करू नका. आनंद
म्हणजे काय तर सुख शांती समाधान, पण ते मिळवण्यासाठी जीवनाचा आटापटा करू
नका जे मिळत आहे त्यात समाधानी रहा. छोटे छोटे गोष्टीतून आनंद शोधत रहा.
दुसऱ्याची श्रीमंती पाहून स्वतः चिंता करून काय उपयोग आहे का? चिंता केल्याने फक्त
शारीरिक व्याधीच वाढतात. चिंतन केल्याने त्याच्यावरती मार्ग काढता येतो. आनंद
मानण्याची प्रत्येकाची रीत ही वेगवेगळी असते. कोणास श्रीमंतीत आनंद वाटतो, तर
कोणास गरिबीतही आनंद वाटतो. पैसा कमावण्याने माणसाची राहणीमान बदलते पण
विचार बदलत नाहीत. अति पैसा आला तर तो सुख शोधण्यासाठी जुगार अड्ड्यावर
असतो किंवा दारूच्या नशेत धुंद होऊन आनंद शोधत असतो. असे सारेच नसतात पण
जे असतात ते दुःखाच्या काही कडेच हळू ढकलले जातात. एक साधं उदाहरण बघा ना!
सातत्याने संपत्तीची काळजी करते. त्यामुळे तिला रात्रीची झोप येत नाही, पुरेशी झोप
घेण्यासाठी डॉक्टर कडून गोळ्या घ्यावे लागतात. तर काही दिवसांनी त्याचाही काही
उपयोग होत नाही. त्यामुळे त्याला झोपेची गोळी घावी लागते त्याने फक्त ग्लानी; येते
उलट दिवसभर काबाडकष्ट करणारी व्यक्ती शेतकरी असेल मजूर असेल संध्याकाळी
जेवल्यानंतर बसलेल्या जागेवरतीच त्याला त्या ठिकाणी गाढ झोप लागते. मग विचार
पडतो. जीवनात आनंदी कोणाला समजायचे. आनंद हा नेहमी विचारावर अवलंबून आहे
. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार करा. पैसा, गाडी, बंगला, श्रीमंती संपत्ती या सर्व
क्षणिक सुख देणा री साधने आहेत. महाराष्ट्रातील वनक्षेत्र जिल्हे
माणसाने जीवनात आनंद मिळवण्यासाठी काही गोष्टीचे पालन करणे गरजेचे आहे.मी
आणि माझे या माणसाच्या प्रवृत्ती मुळे तो अधिक दु:खी होत आहे.मी पण सोडून माणूस
जर वागला तर जीवन नेहमी
सुखी समाधानी होईल .
आनंदी जीवन जगण्यासाठी अनेक गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्यापैकी काही
प्रमुख गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:सकारात्मक दृष्टिकोन: जीवनातील
अडचणींवर मात करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे.
नकारात्मक विचारांऐवजी सकारात्मक विचारांवर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक
परिस्थितीत काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न करा.कृतज्ञता: आपल्या
जीवनात जे काही चांगले आहे, त्यासाठी नेहमी देवाचे आभार माना. आपल्या
कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि आपल्याजवळ असलेल्या गोष्टींसाठी कृतज्ञ रहा.
कृतज्ञता व्यक्त केल्याने आनंद
आणि समाधान वाढते.
वर्तमानकाळात जगा: भूतकाळ
आणि भविष्यकाळाच्या विचारात न अडकता, वर्तमानकाळात जगायला शिका. 'आज'च्या
क्षणाचा आनंद घ्या. वर्तमानावर लक्ष केंद्रित केल्याने तणाव कमी होतो.
इतरांना मदत करा: इतरांना
मदत केल्याने आपल्याला आनंद मिळतो, तसेच आपल्या जीवनात सकारात्मकता येते. गरजूंना मदत करा.
समाजासाठी काहीतरी चांगले काम करा.स्वतःवर प्रेम करा: स्वतःच्या चुकांमधून शिका
आणि स्वतःला स्वीकारा. आपल्यातील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. स्वतःवर
प्रेम केल्याने आत्मविश्वास वाढतो. फरशी काम करणाऱ्याच्या मुलीची बाजी
छंद जोपासा: आपल्या आवडीच्या
गोष्टींमध्ये वेळ घालवा, ज्यामुळे
तुम्हाला आनंद मिळेल. चित्रकला, संगीत, नृत्य किंवा खेळ खेळणे यासारख्या गोष्टींमधून आनंद मिळवा.
छंद जोपासल्याने तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.
नियमित व्यायाम: नियमित योगा
केल्याने आपले शरीर आणि मन दोन्ही चांगले राहतात. दररोज थोडा वेळ व्यायाम करा.
योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
पुरेशी झोप: दररोज रात्री 7-8 तास झोप घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. पुरेशी झोप
घेतल्याने ताण कमी होतो आणि मन शांत राहते.
ध्यान करा: ध्यान केल्याने
तणाव कमी होतो आणि मन शांत राहते. दररोज थोडा वेळ ध्यान करा. ध्यानामुळे एकाग्रता
वाढते.
Comments
Post a Comment